बुडालेल्या जहाजातील दहा कंटेनर किनार्‍याला   

केरळच्या दोन जिल्ह्यांना दक्षतेचा इशारा 

कोलम : केरळमधील कोची जवळच्या समुद्रात नुकतेच मालवाहू जहाज बुडाले होते. त्या जहाजातील कंटेनर समुद्र किनारपट्टीकडे तरंगत आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी सोमवारी केले. 
 
पश्चिम आफ्रिकेतील लिबेरिया या देशाचे मालवाहू जहाज रविवारी सकाळी बुडाले होते. त्यावरील २४ खलाशांना तटरक्षक दलाने वाचविले होते. जहाजावरील काही कंटेनर दक्षिण कोल्लम आणि अलापुझ्झा जिल्ह्यातील किनार्‍यावर तरंगत आले आहेत. सुमारे १० कंटेनर वाहून किनार्‍याला लागल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्यांची नेमकी संख्या अस्पष्ट आहे. प्रशासनाने मात्र खबरदारी घेतली आहे. परिसरात पोलिस फौजफाटा ठेवला आहे. जहाजात एकूण ६४० कंटेनर होते. त्यापैकी १३ मध्ये घातक पदार्थ असल्याचा दावा करण्यात आला होता. जहाज बुडाल्यानंतर तेल आणि कंटेनरमधील घातक पदार्थ समुद्रात मिसळून प्रदूषण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.  त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 
 

Related Articles